Posts

Showing posts with the label marathi blog
Image
  पुण्यनगरीतला सशुश्रीके 'वैचारिक किडा' नावाचा चॅनेल आहे त्यात पुणे विषयावर मिलिंद शिंत्रेची मुलखात ऐकत ऐकत हा लेख लिहीत आहे ☺️ पुण्यात ९०साली आलो अगदी कायमचा...२००७पर्यंत टिकलो! टिकलो म्हणजे जरा अतीच झालं माफी... अनुभवलं 👌👌👌 काय ती मस्त थंडी, तो कडक उन्हाळा न तो आगाऊ पावसाळा! ते छोटे रस्ते, ते म्हातारे रोज सकाळी भटकणारे मोठे भिंगयुक्त चष्मे लावलेले, ते पेपरवाले सायकलवीर अचूक ठिकाणी अचूक पेपर पोचवणारे, अप्पा बळवंत चौकात गर्दी करणारे, सारसबागेत १-४निवांत पडणारे, लुना न कायनेटिक नी रस्ता गाजवणारे! किती ही जवळचे गिर्हाईक असले तरी नाही न म्हणणारे... असे पुणे मी पाहिलेलं आहे, छोटे वाडे मोठे वाडे पडलेले टाकलेले टिकलेले सगळे... प्रत्येक वास्तूत ओलावा न आता झालेला दुरावा... जन्म दोहा बालपण आक्षी मुंबई आता कर्मभूमी दुबई पण जे काय पुणे आलेलं मुंबई आणि दुबई च्या मध्ये! त्याने मला घडवलं... त्या डझनभर पेठांमधूनच मला माझा पहिला पगार मिळाला, सकाळ सारख्या अस्सल पुणेरी वर्तमानपत्राने मला माझा दुसरा job दिला! काय दिलं पेक्षा आपण काय घेतलं ह्याला महत्व! पुण्याने मला तत्व दिलं, पुण्य...

खेळ आठवणींचा!

आठवणी नेहमी मागे असतात  मी नेमका उलटा, आठवणींच्या मागे मी असतो    एखाद्या प्रसंगी कुणाची ना कुणाची आठवण येतेच म्हणजे आता नसलेली व्यक्ती,  आजी आजोबा बाबा काही जुने मित्र  मग ते सल्ले ही देतात  'रिऍक्ट'ही होतात  आठवणींत असलेलले हावभाव, त्यांचे संवाद  तो साऊंडबोर्ड वाजतो तडीक जाम मजा वाटते! उदाहणार्थ... मॅच चालू असेल शेवटच्या टप्प्यातली  काही कमी बॉल्स मध्ये अशक्य वाटणारी धावसंख्या असेल  तर नेहमी बाबांची आठवण येते,  ते अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आशा ठेऊन असायचे.  असे अनेक परत परत घडणारे प्रसंग येतात आयुष्यात  त्या त्या क्षणी तो तो माणूस येऊन डोकवून जातो  #सशुश्रीके 

भयाण Corona

काय ना... २०२० वर्ष असलं उलथापालथ करणारं असेल असं वाटलं नव्हतं... वर्षाचा ३राच महिना! वर्क फ्रॉम होम करून ११ दिवस होतील आज, फक्त २दा बाहेर पडलो आहे ह्या दिवसात, आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मनुष्य मनुष्याला इतका घाबरायला लागेल!  १० काय १०मिनिटे जरी एकटा असलो की कसं तरी व्हायचं, चुकल्या चुकल्या सारखं, आता सवय होत चालली आहे!  किती वाईट ना, जग बदललं काही महिन्यांत, आता आपण बदलत आहोत, घरी रहा... सुरक्षित रहा च्या नावाखाली सगळे स्वखुशीने काही नाईलाजाने दबले गेले आहेत. वर्क फ्रॉम होम आहेच पण ज्यांना शक्य नाहीत त्यांचे हाल, घरी बसून ज्यांना पगार हा पर्याय नाहीये त्यांचे! सकाळी संध्याकाळी त्यांसाठी प्रार्थना करतोय, निदान एवढं तरी नक्कीच करू शकतोय, ज्या संस्था अश्या लोकांना मदत करत आहेत त्याचे शतशः आभार. उगाच / अत्यावश्यक कारण नसताना लोकं बाहेर पडतायत त्यांना हे कळत नाहीये की ते ह्या विषाणूच्या संपर्कात आले आणि त्यांच्या संपर्कात त्यांचे मित्र / नातेवाईक... अहो ते सोडा पत्नी-मुले ही येऊ शकतात आणि पुढे सांगायची गरज नाही, सगळ्यात वाईट गोष्ट अशी की लक्षणे उशीरा कळतात आणि तो पर्यंत उशीर ...

Lockdown!

ह्या Lockdown मुळे नक्की काय होतंय कळत नाही, घराबाहेर पडायला उत्सुकता आणि कुतुहलता आहे पण हिम्मत नाही, घरात बसून काम होतंय, family togetherness का काय ते असतय ते होतंय पण तरी हुरहूर बाहेर न पडता येत ह्याची, अगदी "कससच होतंय" असं म्हणतात तसं काही तरी होतंय का काय कळायला मार्ग नाही . रुग्ण वाढत आहेत, मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे, त्यापेक्षा 'मारणाऱ्यांची संख्या' - ह्यांच काय करावं कळत नाहिये! बँक कर्मचारी, डॉकटर, नर्सेस... झालच तर डिलिव्हरी देणारे, बिचारे... त्यांना पण असतील की पोरं बाळं, जे लोकं इथून तिथे गेले ह्या काळात ते अडकलेत! काही तर देशाबाहेर अडकलेत!!! असला सगळा विचार येतो रोज... हातात मोबाइल, डोळ्यासमोर टीव्ही, ढुंगणाखाली सोफा, वेळेवर चहा जेवण, ऑफिस मधल्या नकोत्या लोकांचे चेहरे दिसत नाहीत, सगळं कसं स्वप्नातलं घडत असताना... 'सगळं ठीक आहे पण सगळं ठीक नाहीये' असं काहीसं जीवन झालंय!  नजर लागलीय बघा जगाला आपलीच!  त्यात एक नावीन युक्तिवाद का काय ते हेतोय, Nature is taking his revenge! प्रदूषण कमी कमी होत चालले आहे वगैरे, प्राणी रस्त्यावर आणि आपण गुहेत!  आनं...