Posts

गुजराती उर्मटपणाला मराठी बाणा महागात पडला...

आम्ही ९०साली बोरिवलीच्या श्रीगणेश इमारतीत राहायचो तेव्हाची गोष्ट, मला प्रसंग आठवतो पण विषय आणि त्याची गांभीर्यता नव्हती माहीत. आज आईशी गप्पा मारताना जुन्या दिवसांच्या गप्पा रंगल्या, त्यातून काही गोष्टी रंगीत झाल्या... आमच्या इमारतीत अर्धे गुजराती आणि अर्धे मराठी होते, गणपती यायचे दिवस होते, त्यामुळे मराठी घरांतुन साफसफाई वगैरे करायची वेळ, घरातून काय अगदी अख्खी इमारातच मस्त छान स्वच्छ असावी हा स्वच्छ हेतू. तर झालं काय, माझी आई नेहमीप्रमाणे संध्याकाळची दळण आणायला गेलेली, इमारतीच्या फाटकात शिरतानाच भिडे काका ( आईच्या लहानपणीपासून ओळखीचा, आक्षीचा शेजारी, आमचा विष्णू भिडे, पण म्हणायचे सगळे मधू काका ) ... तर मधू भिडे एका माणसाकडे तावातावाने गेला, पायातली चप्पल हातात घेऊन त्या इसमाच्या श्रीमुखात खेचली, आई पळत पळत डबा बाजूला ठेऊन काय झालं काय विचारताना मधू भिडे म्हणाला, सोड... अजून दहा वेळा मारीन त्याला कानाखाली! गर्दी वाढली, एका बाजूला गुजराती एका बाजूला मराठी... नंतर कळाला प्रकार. तो गांधी म्हणून एक होता, आमच्या इमारतीचा कार्याध्यक्ष (सेक्रेटरी) आणि त्याच्या घरी चालू होते घराचे काम, त्यामु...

पान!

Image
पान म्हणालं की कलकत्ता सादा आठवतं, मग मसाला मग मगई... त्यापलीकडे कधी मजल गेली नाही! पण ह्या पाना आधी एक महत्वाचं पान म्हणजे आपलं... केळीचं पान! आठवतं का केळीचं पान, आता त्यावर जेवण मिळवणे म्हणजे जरा "नशीब वान आहेस लेका!" वगैरे म्हणावं लागतं! पारंपरिक गोष्टींचा रितिरिवाजांचा जसा ऱ्हास होत चाललाय, तसाच ह्या पानांवर जेवण केरण्याचा ही, बरोबर आहे म्हणा! आता जागा नसते ना, जिथे जागा असते तिथे भलत्याच गोष्टींनी जागा घेतलेली आहे आज काल! असो... केळीच्या पानावरचे जेवण लहानपणी खूप अनुभवले, त्यावर तरंगणारे पाणी, अगदी बरोब्बर मध्ये असलेल्या लांब देठाचा मोठेपणा! मोठेपणा म्हणजे... त्यामुळेच तर ते पान टिकतं ना, मस्त सांभाळून घेते २ही बाजू, जणू काही पुस्तकाची बांधणीच. खाद्यपरार्थ स्वरूपात मांडलेल्या त्या हिरव्या गडद पाना वरची ज्ञानाची भूक काही औरच! त्या पानावर जेवण असले की त्या गर्द हिरव्या रंगावर जो काही पदार्थ उठून दिसतो, त्याला तोडच नाही... पांढरा शुभ्र भात त्यावरचं नाजूक पिवळं वरण आणि त्याहून नाजूक साजूक तूप! मस्तच कॉन्ट्रास्ट, आजूबाजूला कोशिंबीर, आळूच्या वड्या, चटण्या, बटाटा भ...

आठवणींचं जग

आठवणींचं जग कसं वेगळं असतं, बंधनं नसतात, नसतात नियम! कुठे ही जा, केव्हा ही जा... पण काय आहे ना... सगळं 'स्क्रीपटेड' असतं, माहीत असतं काय होणार! कसं, केव्हा, कधी.. सगळं. काहीच बदलता येत नाही... तरी आठवणींत रमायला जास्त आवडतं, कितीही 'स्क्रीपटेड' असलं तरी शेवटी, 'ओरिजिनल' ते 'ओरिजिनल'च असतं. तुमच्या आमच्या सगळ्यांचं, आठवणींचं जग कसं वेगळच असतं! #सशुश्रीके । १४ डिसेंम्बर २०१६

वाट

वाट पाहणे संपत नाही... जागा बदलतात माणसं बदलतात स्वप्न बदलतात वय वाढतं अपेक्षा वाढतात वाढतात नाती वाट पहायची सवय लागते वाट सोडण्याची गरज वाटते वाट दाखवण्याचे धाडस लागत...

काच...

मध्ये एक काच असते कधी साधी कधी काळी असते एक नेहमी... कधी वेगात कधी थांबलेली कधी अर्धी उघडी कधी पूर्ण कधी दुधाळ कधी स्पष्ट कधी स्वच्छ कधी मळकट कधी नंबरी कधी नुसती कधी गारठून...

धप्पा

धप्पा / भोज्जा हा शब्द उच्चारायला जितकी मजा यायची तितकीच भीती असायची आपल्या मागून ऐकायला... तो शब्द ऐकला की परत ये रे आपल्या मागल्या! परत शोधा सगळ्यांना, नियम असले तरी ते पाळतय कोण, काही मुलं साली घरी बसून चहा-पोळी तोडत बसायची काही गच्चीत जाऊन लापायची... पण काही काका / आजोबा मंडळी मदत करायची, कारण नियम त्यांनाही माहिती असावेत!  त्यांच्या ह्या अमूल्या मदतीने कधी कधी ते नको असलेलं राज्य संपायचं! हुश्श... सर्व पकडले गेले, पहिला जो पकडला गेला तो प्रामाणिकपणे राज्य तरी घ्यायचा नाही तर पळ काढायचा, मग तो गेल्यावर त्यानंतरच्यावर राज्य!  असो... जेव्हा 'धप्पा'दायक बातमी साठी आपले हात शिवशिवतात तो क्षण कसला भारी असतो... आणि राज्य घेणारा नेमका चुकून वळून बघणार ह्यासारखं दुर्दैव नाही जगात... हो, असे क्षण पण वाट्याला येतात! पण फार क्वचित, फारच बलवत्तर असावं लागतं नशीब अगदी मोक्याच्या वेळी धप्पा परतवण्याचं!  तर एवढं सगळं का सांगतोय, तर आता भारत सरकारने पण असला जबरदस्त धप्पा दिलाय... आणि तो पण न चिटिंग करता, नियमात राहून!  ज्याला धप्पा दिलाय तो सोडून सगळे खुश, हे राज्य अ...

वस्तू

Image
दर वर्षीच माटुंगा मध्ये पाणी साचतं, त्यावर्षी ही तसेच, २००४/०५असेल नीट आठवत नाही, नवीन नोकरीचे पहिले काही वर्ष, त्यामुळे खर्च जरा जपूनच करावा लागायचा... आणि काही महाग वस्तू घेतली की त्याची 'किंमत' जरा दुप्पट असायची. असो... तर झालं काय, मी घेतलेले नवीन बूट! ज्यादिवशी घेतले त्यादिवशी निळं आकाश, दुसऱ्या दिवशी सकाळी ही तसंच, पण दुपारी निळं आकाश राखाडी झालं, आणि संध्याकाळी काळं, धो धो नॉन स्टॉप पाऊस, माटुंग्याची हालत काय झाली असणार ह्या कल्पनेनीच मी भिजलेलो, प्लॅटफॉर्म बदलला, मुख्य रस्त्याच्या अंदाजे ३-४शेवटच्या पायऱ्या पाण्यात विलीन झालेल्या, माझ्या डोक्यात बूट होते, ते मी हातात घेतले... त्या वेळी काही जास्त विचार न करता हातात बूट घेऊन मी घरी जायला निघालो, अंदाज लावत लावत, जाता जाता एक बाटाचं दुकानही दिसलं, चपला होत्या त्यात, पण चपला घेण्याइतके पैसे नव्हते... पाय पुढे गेले, समुद्रात आपण कसे बिंदास चालत असतो... लागलं तर काय लागेल... शंख शिंपले! इथे मामला वेगळा होता, पण तो विचारच नाही! घरी आल्यावर गानू काकांनी मी केलेला प्रकारचा सौम्य भाषेत निषेध दर्शवला! आणि त्यांचं खरं ही हो...